Posts

Showing posts from February, 2022

त्यांचे असत्याचे प्रयोग!

Image
गांधींविषयी गैरसमज पसरविणा-या ,  त्यांचे चारित्र्यहनन करणा-या अशा अनेक गोष्टी पसरविल्या जात आहेत. त्यांची बनावट चित्रे तयार करून ती प्रसारित केली जात आहेत. याचा हेतू एकच असतो - गांधींचा सहिष्णुतेचा ,  सर्वधर्मसभावाचा ,  सत्य आणि अहिंसेचा विचार पुसून टाकणे. एकदा तो विचार मागे पडला ,  की मग एक पुतळा म्हणून वा एक चष्मा म्हणून गांधींना मिरविण्यात या विरोधकांची काहीही हरकत नसते. आज त्या असत्याचे प्रयोग जोमाने सुरु आहेत …     महात्मा गांधींबाबत एक विचित्र प्रकार सध्या सुरू आहे. देशात भाजप सत्ताधारी आहे. या पक्षाचे सध्याचे सर्वोच्च नेते आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी. ते महात्मा गांधींची सातत्याने पाद्यपूजा करताना दिसतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची मातृसंस्था. गांधीजी हे तिला फारा वर्षांपासून प्रातःस्मरणीय आहेत. आणि याच संस्थेच्या परिघावर असलेल्या काही संघटना ,  संघीय-हिंदुत्वाचा विचार मानणा-या अनेक व्यक्ती ,  भाजपचे अनेक नेते ,  त्यांचे ट्विटरवरील समर्थक ,  जल्पक हे सारे महात्मा गांधींचा मनःपूर्वक द्वेष आणि नथुराम गोडसेवर हार्दिक प्रेम करताना दिसतात. यातील विसंगतीने अनेक जण अवाक् होताना

गांधी जिवंतच आहेत!

Image
थोर व्यक्तींना दोन मरणे असतात . एकदा त्यांचे प्राण जातात तेव्हा आणि दुसऱ्यांदा त्यांच्या विचारांची हत्या केली जाते तेव्हा . मोहनदास करमचंद गांधी नावाचा महात्मा यास अपवाद . त्यांना ‘ पहिले ’ मरण आले वयाच्या ७९व्या वर्षी . एका माथेफिरूने त्यांच्या छातीत तीन गोळ्या डागल्या . ‘ हे राम ’ असे अस्फुट उद्‌गार काढत तो वृद्ध महात्मा कोसळला . उद्या त्या घटनेस ७४ वर्षे होतील . त्यानंतर या इतक्या वर्षांत त्यांच्या हत्येचे प्रयत्न वारंवार झाले . काही स्वतःला गांधींचे अनुयायी म्हणणाऱ्या भोंदूंनी केले , काही विरोधकांनी . टिंगलटवाळी , चारित्र्यहनन , बदनामी , असत्ये , अपमाहिती , अपप्रचार ही या विरोधकांची अस्त्रे . पण मौज अशी , की त्यानेही गांधीजी संपले नाहीत . त्यांच्या खुन्याचे गोडवे गाणाऱ्या प्रवृत्तींनी त्यांना चरखा , चष्मा आणि खादीत गुंडाळण्याचा प्रयत्न केला , की एकदा त्यांना अशा प्रतिकांत कोंडले की त्यांचे विचार नामशेष होतील . परंतु त्याचाही परिणाम झाला नाही . गांधीजी मरत नसतात हे वारंवार सिद्ध होत